Monday, November 23, 2009

26 / 11 ना हो दोबारा...

२६ नोव्हेंबर २००८, रोजी मुंबईवरझालेल्या आतंकवादी हल्ल्याला आता १ वर्ष पूर्ण होईल.ज्यादिवशी हा हल्ला झाला तेव्हा आम्ही पण जवळजवळ रात्री ८ . १५ वाजेपर्यंत आमच्या कुलाबायेथील ऑफिस मध्ये काम करत होते. थोडक्यात दहशतवाद्याची वेळ चुकली म्हणून नाहीतर माझ्या बाततीतही काय घडल असत? ह्याची कल्पना करवत नाही.मला तर अस वाटत कि,त्या दिवशी दहशतवाद्याची वेळ ही चुकायला नको हवी होती तर त्यांची ती बोटच समुद्रामध्ये वादळ येऊन कुठेतरी बुडायला हवी होती.अस का झाल नाही?



कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जे काही कृत्य केल ते अक्षरशा मानवतेला कालीम्बा फासणार आहे.ह्या अमानुष हल्याची कल्पना नसलेल्या नागरिक आणि सुरक्षा रक्षकांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले.त्या दिवशी घडलेल्या हल्ल्यामुळे आनेकाना अपंगत्व आल,काहिच्या जख्मा ह्या अजुनही तश्याच आहेत. आतंकवादयानी फेकलेल्या ग्रानाईटचे छरे हे काहीच्या शरीरातील शिरांमध्ये अजुनही आहेत आणि त्याच्या वेदना ह्या त्यांना आता आयुष्यभर भोगाव्या लागणार आहेत.

ह्या हल्ल्यात आपल्या जीवाची पर्वा न करता किवां आपल्या पाठी असलेल्या कुटुंबाचा जरा सुद्धा विचार न करता ज्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलीस जवानांनी आतंकवादाच्या तावडीतून अनेक  नागरिकांना सुखरूप सोडवले आणि स्वता मात्र शहीद झाले अश्या  सर्वं शहीद झालेल्या थोर कर्तबगार पोलीस आणि वीर जवानांना परत एकदा Hats off to them all.

ह्या हल्यानंतर मुंबई ही परत एकदा उभी तर राहिली आणि ह्या पुढेही जर का अशी वेळ परत आलीच तर आता ही मुंबई तिचा सामना करायला ही तेवढीच तयार आहे.पण दुख हे एकाच गोष्टीच वाटत कि, अजूनही ह्यापुढे  अशे किती हल्ले विनाकारण आपण झेलत राहणार आणि त्यात निष्कारण, निष्पाप  जीव हे मारले जाणार?

1 comment:

  1. suchi khup chhan lihile ahes. Mumbainech kay tar sampurn Bhartane aaj paryant anek halle sahan kele ahet. Manavta kiti khalcya patlivar jau shakte yache examples velo veli ashya ghatnetun aplya samor alele ahet. Ase ankhi kiti divas chalnar ahe? Yache utter denyachi takad aaj paryant konachyat nirman zhaleli nahi.

    ReplyDelete